13 जागा जिंकत राज्यात बनला नंबर एकचा पक्ष

नाशिक :लोकसभा निवडणुका घोषित झाल्या आणि चर्चा सुरू झाल्या भाजपाला किती जागा मिळतील, उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांचे पक्ष फुटले आणि चिन्ह पण गेले मग दोघे निवडणुकीत टिकाव धरणार का ? शिवसेनेतून फुटलेल्या शिवसेनेला व राष्ट्रवादीतुन फुटलेल्या अजित पवार गटाला मतदार स्विकारतील का ? याच चर्चा मीडियात व सामान्य नागरिकांमध्ये सुरू होत्या. मात्र फार चर्चेत नसलेल्या राष्ट्रीय कॉग्रेस पक्षाने ज्यावेळी महाराष्ट्रात मुसंडी मारली त्यावेळी प्रत्येकाच्या तोंडी कॉग्रेस आणि इतक्या जागा हीच चर्चा होती. 2019 च्या लोकसभेचा विचार करता महाराष्ट्रात कॉग्रेसला अवघी एकच जागा मिळाली होती. यावेळी शिवसेनेच्या ठाकरे गट आणि शिंदे गटांच्या जागांची बेरीज जरी केली तरी 2019 च्या तुलनेत कमी झालेली दिसते याउलट कॉग्रेसच्या महाराष्ट्रात जागांची संख्या तब्बल 12 पटीने वाढली हे विशेष आणि कॉग्रेस ने ज्या पद्धतीने कमबॅक केला ते आश्चर्यकारक वाटते. यावरून एक लक्षात येते की कितीही वादळ-वारे येऊ देत कॉग्रेसने आपली पाळेमुळे महाराष्ट्रात अगदी घट्ट रोवली आहेत. मुख्य म्हणजे एकमेकांना पाण्यात पाहणारी शिवसेना व कॉग्रेस आज चक्क एकत्र येऊन लागलेल्या निकालाची फळे चाखत आहेत. यातील विशेष गोष्ट म्हणजे ज्यावेळी शिवसेना, कॉग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट एकत्र आली त्यावेळी ही वेगवेगळ्या विचारधारेची पक्ष आपापल्या मतपेढ्याचा लाभ एकमेकांना पोहचवतील का ? किंवा कॉग्रेसला मानणारा वर्ग शिवसेनेला अथवा शिवसेनेला मानणारा वर्ग कॉग्रेसला मतदान करेल का या विषयावर राजकिय अभ्यासकांची जोरदार चर्चा झाली .मात्र यावर स्पष्ट कोणीही बोलू शकले नाही. निकालानंतर हे दिसून आलं की शिवसेना व कॉग्रेस आपापल्या मतपेढ्याचा लाभ पोहचवण्यात मोठ्या प्रमाणात यशस्वीच झाले नाही तर एकमेकांचे उमेदवार निवडून आणण्यासाठी कार्यकर्त्यानी देखील जीवाचे रान केले. यादरम्यान कॉग्रेसला अनेक मोठ्या नेत्यांनी सोडचिठ्ठी दिली. अशोकराव चव्हाण जे माजी मुख्यमंत्री होते त्यांनादेखील ऐनवेळी पंजा सोडत कमळ हाती घेतले. मुंबईतील अनेक नेते-मंडळी यांनी कॉग्रेसला बाय-बाय केलं अशी अवस्था कॉग्रेसची महाराष्ट्रात होती. राज्यात प्रभाव पाडू शकेल असा कुठलाही मोठा नेता नसताना .कॉग्रेसने महाराष्ट्रात मोठी मुसंडी मारली आणि आज महाराष्ट्रात खासदारांच्या संख्येच्या बाबतीत क्रमांक एकच पक्ष झाला हे विशेष,महाराष्ट्रात महाआघाडीत कॉग्रेसच्या वाट्याला 17 जागा आल्या होत्या. त्यापैकी 13 जागांवर कॉग्रेसने घवघवीत यश मिळविले. डॉ शोभा बच्छाव (धुळे) वर्षा गायकवाड (मुंबई उत्तर-मध्य) प्रणिती शिंदे(सोलापूर) शाहु महाराज (कोल्हापूर) गोवाल पाडवी (नंदुरबार) प्रतिभा धानोरकर (चंद्रपूर) बळवंत वानखेडे(अमरावती) श्यामकुमार बर्वे (रामटेक) डॉ नामदेव किरसान (गडचिरोली-चिमूर) डॉ प्रशांत पडोळे(भंडारा-गोंदिया) डॉ कल्याण काळे (जालना) शिवाजी काळगे(लातूर) वसंत चव्हाण (नांदेड)

![]()














