धार्मिक विधीसाठी नासिक मध्ये बाहेरगावाहून येणाऱ्यांची मोठी गैरसोय

नाशिक : काही दिवसांपूर्वी संपूर्ण देशात गॅस सिलिंडर टंचाई निर्माण झाली होती. मात्र आता थोड्या फार प्रमाणात परिस्थिती पूर्वपदावर आलेली असताना देखील सामान्य नागरिकांना आज देखील गॅस सिलिंडर टंचाईला सामोरे जावे लागत असल्याने संताप व्यक्त होत आहे. शहरातील गंगा गोदावरी तीरावर धार्मिक विधी करण्यासाठी देशभरातून नागरिक येत असतात. यामध्ये अस्थी विसर्जन, दशक्रिया विधी यासारख्या कार्यक्रमांसाठी नागरिकांची मोठी गर्दी याठिकाणी असते. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचे निधन झाल्यास त्या व्यक्तीचे श्राद्ध्यविधी करावे लागतात. श्राद्ध्य विधी असो की मग दशक्रिया विधी कार्यक्रम असो कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या शोकाकुल कुटुंबातील सदस्य तसेच नातेवाईक व मित्रमंडळी यांना भोजनावळी देण्याचे पूर्वपार प्रथा आहे. त्यासाठी नाशिकला मोठ्या प्रमाणात लोक येत असतात. मात्र आखाती देशात मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या युद्धाचा मोठा भडका उडाल्याने गॅस सिलेंडरची टंचाई निर्माण झाली आहे. त्याचाच फटका आता कुटुंबातील निधन झालेल्या व्यक्तीचे श्राद्ध्यविधी करण्यासाठी गंगा घाटावर आलेल्या कुटुंबांना बसत आहे. श्राद्ध्यविधीसाठी हॉल उपलब्ध होत असला तरी मात्र स्वयंपाक बनविण्यासाठी गॅस सिलेंडर शोकाकुल कुटुंबाला आणण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. गंगा घाटावर हॉल उपलब्ध होत असला तरी कार्यक्रमात सहभागी होणारे नातेवाईक व इतर मित्रमंडळींना भोजन देण्यासाठी सिलेंडरची शोधाशोध करण्याची वेळ आली आहे. मागील काही दिवसांपासून हॉलवाले हे सिलेंडर तुम्ही घेऊन या असे सांगत आहे मात्र बाहेरगावून आलेल्या नागरिकांना ही गोष्ट शक्य होत नसल्याने गंगा घाटावर असलेल्या दशक्रिया विधी कार्यालय चालकांना याचा फटका बसत आहे. सिलेंडर उपलब्ध होत नसल्याने आम्ही हॉल देतो मात्र भोजन बनविण्यासाठी तुम्ही सिलेंडर करून द्या आम्ही स्वयंपाक करून देतो अशी सांगण्याची वेळ आता हॉलवाल्यांवर आली आहे. त्याचप्रमाणे तुम्ही सिलेंडर आणल्यास सरकारी भावाने झालेले पैसे तुम्हाला परत करण्यात येतील असेही सांगण्यात येते. साध्यविधीसाठी शोकाकुल कुटुंबातील सहभागी होणाऱ्यांची संख्या 100 ते 150 इतकी असते व्यावसायिक सिलेंडर मध्ये एक वेळा जवळपास 500 नागरिक जेवण करतील. यामध्ये वरण-भात, भाजी व पापड मेनू बनविता येतो. मागील काही दिवसांपासून श्राद्ध्यविधी करण्यासाठी येणारे शोकाकुल कुटुंबातील सदस्य स्वतः गॅस सिलेंडर घेऊन येतात व कार्यक्रम आटोपल्यावर घेऊन जातात. अशी काहीशी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रासाला सामोरे जावे लागत आहे


![]()















