आमचं महाराष्ट्र आमचं मतदान

नाशिक : केंद्रीय निवडणूक आयोगाने आज पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत केंद्रीय निवडणूक आयोगाचे प्रमुख राजीव कुमार यांनी काही महत्वाचे मुद्दे मांडले. केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्राचा दौरा केल्यानंतर ही पत्रकार परिषद घेतली यादरम्यान निवडणूक आयोगाने 11 राजकीय पक्षांशी चर्चा केली यामध्ये कॉग्रेस,भाजपा, शिंदे गट शिवसेना,ठाकरे गट शिवसेना, राष्ट्रवादी अजित पवार गट, राष्ट्रवादी शरद पवार गट, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आदी पक्षांचा समावेश आहे. यामध्ये आम्ही सर्व पक्षांच्या सूचना, विनंत्या ऐकून घेतल्या, दिवाळी सणाचा विचार करून निवडणुकांच्या तारखांचा विचार करावा अशा सूचना सर्वच राजकीय पक्षांनी केल्याची माहिती राजीव कुमार यांनी दिली. निवडणूक आयोगाचे काही महत्वाचे मुद्दे 1) विधानसभेची मुदत 26 नोव्हेंबर रोजी संपणार आहे. त्यामुळे निवडणूक प्रक्रिया त्याआधी पूर्ण करावी लागेल 2) आमचं महाराष्ट्र आमचं मतदान अशी टॅगलाईन असेल 3) शहरातील सर्वच मतदान केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे असतील 4) 9 कोटी 59 लाख मतदारांची संख्या त्यामध्ये पुरुषांची संख्या 4.59 कोटी तर महिलांची संख्या 4.64 कोटी 5) 22 टक्के महिला मतदार वाढल्या 7)6.3 लाख दिव्यांग मतदार 8) 100 वर्षांवरील मतदारांची संख्या 49 हजार इतकी 9) प्रथमच मतदान करणाऱ्या 18 वर्षांवरील मतदारांची संख्या 19.48 लाख इतकी 10) शहरी व ग्रामीण भागात मतदान केंद्रांची संख्या सारखीच 11) मोठ्या रांगा टाळण्यासाठी प्रयत्न करणार 12) रांगेतील मतदारांसाठी खुर्च्यांची सोय करणार 13) मतदार कुठेही असो त्याच्या पर्यंत पोहचणार 14) दारू, पैसा अन्य गैरप्रकारांवर राज्यात ३००हून अधिक चेक नाके नजर ठेवतील 15)काही मतदान केंद्रें फक्त महिलांच हाताळतील 16) सक्षम APP द्वारे मतदान वाढवण्याचा प्रयत्न
गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांसाठी नियम गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांबाबत बोलताना राजीव कुमार म्हणाले ज्या उमेदवारांवर तीन गुन्हे दाखल असतील त्या उमेदवारांना प्रिंट मीडिया व इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये जाहिरात प्रसिद्ध करून त्याबाबत डिक्लेरेशन दयावे लागेल. याशिवाय त्या पक्षांनाही अशा गुन्हेगारी
पार्श्वभूमी असलेल्या उमेदवाराला तिकीट का दिले.याची अशीच जाहिरात दयावी लागेल. तब्बल तीन दिवस अशी जाहिरात उमेदवार व पक्षाला दयावी लागेल.

![]()














