माजी महापौर,नगरसेवक, नागरिकांनी अधिकाऱ्यांना धरले धारेवर

नाशिक :बुधवारी रात्री इंदिरानगर परिसरातील भारत नगर, दीपाली नगर, वडाळागाव, विनयनगर,साईनाथ नगर इंदिरानगर परिसरातील अर्धा भागातील वीजपुरवठा तब्बल 12 तास खंडित झाला होता रात्री 10 वाजेच्या दरम्यान गेलेली वीज सकाळी 10 वाजता आल्याने नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले यावेळी लहान मुले देखील त्रस्त झाले होते एकीकडे भयंकर उकाडा, आणि अंगाची होणारी लाई-लाई यामध्ये जागून नागरिकांनी रात्र काढली. मुख्य म्हणजे वीज पुरवठा खंडित होण्याचा हा पहिलाच प्रकार नव्हता तर गेल्या अनेक वर्षांपासून इंदिरानगर परिसरातील नागरिक हे सहन करत आहेत, त्यानंतर न्यूज ब्लँक अँड व्हाइटच्या वतीने या घटनेला वाचा फोडल्यानंतर आज आमदार देवयानी फरांदे यांनी नाशिकरोड परिसरातील महावितरणचे मुख्य कार्यालय गाठत अधिकाऱ्यांना धारेवर धरत वारंवार वीज पुरवठा खंडित का होतो यासंदर्भात जाब विचारत घेराव घालण्यात आला. यावेळी महावितरणचे अधीक्षक अभियंता पडळकर यांनी सांगितले की दोन किलोमीटर वीज वाहिनीवर तीन मोठे फॉल्ट निघाले असल्यामुळे वीजपुरवठा अधिक काळ झाल्याचे सांगितले तसेच दोन दिवसात वीज वाहिनी दुरुस्त करण्याचे आश्वासन पडळकर यांनी दिले .यावेळी संतप्त नागरिकांनी वीज कर्मचाऱ्यांना फोन केल्यावर प्रतिसाद मिळत नसल्याची तक्रार केल्याने त्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी आ. फरांदे यांनी केली यावेळी मा.महापौर सतीश कुलकर्णी, मा नगरसेवक चंद्रकांत खोडे, मा. नगरसेवक दीपाली कुलकर्णी, मा नगरसेवक सतीश सोनवणे, मा नगरसेवक यशवंत निकुळे, मा. नगरसेवक श्याम बडोदे, मा नगरसेवक अजिक्य साने, मा. नगरसेवक सुनील खोडे सचिन कुलकर्णी, नितीन बांडे यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर दुसरीकडे वीज ग्राहक कृती समितीच्या वतीने महावितरण अधिक्षक अभियंता पडळकर यांना निवेदन देण्यात आले यावेळी रमिझ पठाण, संदीप जगझाप, प्रवीण जाधव उपस्थित होते.



![]()














