इन्स्टाग्राम प्रकरणात एकतर्फी कारवाई, सुत्रधाराचा शोध घ्या…

नाशिक : काही दिवसांपूर्वी नाशिक मध्ये इंस्टाग्राम वर वादग्रस्त पोस्ट टाकल्या प्रकरणी द्वारका ते उपनगर दरम्यान मोठ्या प्रमाणात जमा जमला आणि देश विरोधी घोषणा देण्यात आल्या. मात्र नाशिक पोलिसांनी त्यावर कोणती कारवाई का केली नाही असा आरोप भाजपच्या आमदार देवयानी फरांदे यांनी केला आहे. हिंदू धर्मियांच्या भावना दुखावणारी इंस्टाग्राम ची मूळ पोस्ट टाकणाऱ्या कारवाई न करता प्रतिक्रियात्मक पोस्ट टाकणाऱ्यावर एकतर्फी कारवाई करण्यात आली आहे. असाही आरोप त्यांनी केला आहे. या प्रकरणातील मुख्य सुत्रधाराचा शोध घेण्याची मागणी आ. फरांदे यांनी पत्रकार परिषदेत केली. त्यावेळी त्यांनी पोलिसांच्या भूमिकेबद्दल अनेक शंका उपस्थित केल्या, गेल्या आठवड्यात इंस्टाग्राम वर एक वादग्रस्त पोस्ट टाकल्याने रात्रीच्या सुमारास एक समुदाय रस्त्यावर उतरल्याने तणाव निर्माण झाला होता. तसेच जमावाने काही गाड्यांवर दगडफेक केली या प्रकरणी पोलिसांनी पोस्ट टाकणारा, तसेच जमावाच्या विरोधात गुन्हा दाखल केला मुळात इंस्टाग्राम प्रकरणात ज्या युवकावर गुन्हा दाखल केला त्याची ती प्रतिक्रिया होती. कारण मूळ पोस्टमध्ये हिंदू देवदेवतांच्या विरोधात पोस्ट टाकण्यात आली होती. मात्र त्याच्यावर कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल करण्यात आला नाही. असा आक्षेप फरांदे यांनी घेतला त्याचप्रमाणे नाशिक पुणे मार्गावर प्रचंड गर्दी करण्यात आली. वाहनांवर दगडफेक करून पोलिसांवर कारवाईसाठी दबाव टाकण्यात आला. एकतर्फी मार्ग बंद करण्यात आला. आणि रात्री बारा ते पहाटे चार पर्यंत सर्व प्रकार सुरू होता. शहरात शांतता नांदावी म्हणून हिंदू समाजाने कोणती प्रतिक्रिया दिली नाही. मात्र देशविरोधी घोषणा देऊन देखील पोलिसांनी कोणती कारवाई केली नाही. जमलेल्या जमावापैकी काहींकडे शस्त्र होती. अशा प्रकारच्या घटनेमागे देश विरोधी शक्ती आहेत काय ? याचा देखील शोध घेतला पाहिजे असे मागणी आ. देवयानी फरांदे यांनी केली लवकरच लोकसभा निवडणुका होत आहे. या निवडणुका लोकशाही मार्गाने होऊ न देणे असा देखील प्रयत्न होत आहे. असेही फरांदे म्हणाल्या.
![]()















