
नवी दिल्ली : निवडणूक आयोगाने ‘एनएचएआय’ला (नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया) लोकसभा निवडणुकीनंतर महामार्गावर नवीन टोल दर लागू करण्यास सांगितले आहे. साधारण टोल नाक्यांवरील दर एक एप्रिल पासून वाढवले जातात. मात्र नवे दर निवडणुकीनंतरच लागू करा असे आयोगाने म्हटले आहे. निवडणूक आयोगाने एनएचएआय ला टोल दरवाढ पुढे ढकलण्यात सांगितले आहे. या संदर्भात रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्र्यांच्या पत्राला उत्तर देताना निवडणूक आयोगाने ही माहिती दिली. टोल शुल्कात सरासरी पाच टक्क्यांनी वाढ होईल असे मानले जात होते. “एन एचएआय” च्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की घाऊक किमतीत निर्देशकांवर आधारित चलनवाढीच्या बदलानुसार टोल शुल्क दरवर्षी बदलले जातात. देशातील 18 व्या लोकसभेच्या निवडणुका 19 एप्रिल पासून सुरू होणार असून एक जून पर्यंत चालणार आहे चार जून रोजी मतमोजणी होणार आहे.
![]()















