
पुणे : राज्य विज नियामक आयोगाने गेल्या वर्षी दिलेल्या आदेशानुसार महावितरणच्या वीजबिलात सरासरी साडेसात टक्क्यांची वाढ होणार असून स्थिर आकारातही 10% दरवाढीचा बोजा सहन करावा लागणार आहे. त्यामुळे उन्हाचा तडाखा वाढत असताना महावितरणाच्या वीज ग्राहकांना एक एप्रिल पासून वीज दरवाढीचा शॉक बसणार आहे. परिणामी वीज बिलात किमान 50 रुपयांची वाढ होणार आहे. राज्यातील विजेचे दर देशात सर्वाधिक असताना “महावितरण” ने गेल्या वर्षी सादर केलेली वीज दरवाढीची याचिका राज्य वीज नियामक आयोगाने मंजूर केली आहे.
![]()















