इच्छुक उमेदवारांच्या दिल्ली, मुंबई वाऱ्या सुरूच..

नाशिक : लोकसभा निवडणुकीत नाशिकची जागा मिळवण्यासाठी महायुतीत रस्सीखेच सुरू असून इकडे महाविकास आघाडीचा उमेदवार ठरत नाही अशी स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे इच्छुकांच्या जीवाची घालमेल होत आहे नाशिकची जागा महायुतीतून शिंदे गट लढवेल अशीच चर्चा होती मुख्यतः या गटाचे खासदार हेमंत गोडसे विद्यमान असल्याने शिंदे गटच जागा लढवेल असे मानले जात असतानाचभाजपा कडून दिनकर पाटील यांचे नाव पुढे आले. आणि भाजपातील इच्छुक सरसावले आमदार आणि पदाधिकाऱ्यांनी सह्यांचे निवेदन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले त्याच बरोबर भाजपा कार्यकर्त्यांनी साखळी उपोषणाचा देखील इशारा दिला. हा तिढा सुरू असतानाच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने देखील महायुती बरोबर युती झाल्यास नाशिक लोकसभा मतदारसंघावर दावेदारी केली त्यांच्याकडून स्वामी शांतिगिरी महाराज, डॉ प्रदीप पवार ही नावे पुढे आल्याने पेच वाढला त्यानंतर ही जागा नक्की कोणाला सुटणार व उमेदवार कोण असणार यावर प्रश्नचिन्ह लागले आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीतून नाशिकची जागा ठाकरे गट लढणार असे सांगण्यात येत होते विधान परिषदेच्या निवडणुकीत नाव निश्चित होऊन देखील संधी नमिळाल्याने विजय करंजकर यांना संधी देण्याचे आधी ठाकरे गटाकडून सांगण्यात येत होते. मात्र, नंतर पक्षांतर्गत गोंधळ असून पर्यायी उमेदवार शोधण्याचे काम पक्षीय पातळीवर सुरू असल्याचे सांगण्यात आले. त्यात नितीन ठाकरे माणिकराव कोकाटे अशी अनेक त्यांची नावे चर्चेत येत असून पक्षाला सक्षम उमेदवार मिळत नसेल तर राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला जागा सोडावी यासाठी देखील प्रयत्न सुरू असल्याचे समजते.शरद पवार गटाकडून गोकुळ पिगळे, नितीन ठाकरे यांच्या नावांची चर्चा आहे. त्याचबरोबर नाशिक लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ असून चार तालुक्यांचा म्हणजेच ग्रामीण भागांचा समावेश आहे. जागा सुटत नसल्याने इच्छुक यांना प्रचार करावा की, जागा आणि उमेदवारीसाठी मुंबई, दिल्लीत वाऱ्या कराव्यात हा महत्त्वाचा प्रश्न पडला आहे त्यामुळे सर्वच पक्षांच्या इच्छुकांमध्ये धाकधूक वाढली आहे.
![]()














