17 संशयित आरोपी निष्पन्न

नाशिक : रंगपंचमीच्या दिवशी 19 मार्च रोजी पुणे हायवेवर असलेल्या आंबेडकरवाडीत झालेल्या जाधव बंधूंच्या हत्याकांडाचा तपास आयुक्तालयाच्या एसआयटी कडून सुरू असून या गुन्ह्याच्या तपासात एकूण 17 आरोपी निष्पन्न झाले आहेत. परिसरातील वर्चस्ववादातुन टोळक्याने प्रशांत व उमेश जाधव या सख्ख्या भावांचा अत्यंत निर्घृणपणे खून केला होता. या दरम्यान तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत नागरिक व नातेवाईकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता. त्यानंतर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी या प्रकरणाचा तपास करण्यासाठी एसआयटीची स्थापना केली होती. त्यानंतर खून करण्यासाठी वापरलेले कोयते पोलिसांनी जप्त करत या गुन्ह्यातील पुरावे नष्ट करणारी साखळी शोधून काढली होती. पुरावे नष्ट करण्यापासून वेगवेगळ्या घटनेत सहभागी असलेल्या 17 संशयितांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या.90 दिवसात 1400 पानांचे दोषारोपपत्र न्यायालयात सादर करण्यात आले आहे. यामध्ये संशयित आरोपी सागर मधुकर गरड, अनिल विष्णू रेडेकर, सचिन विष्णू रेडेकर, अविनाश उर्फ सोनू नानाजी उशीरे, योगेश चंद्रकांत रोकडे, योगेश मधुकर गरड, मंगेश चंद्रकांत रोकडे, निलेश शांताराम महाजन, रुपेश दिलीप रोकडे, यांना अटक करण्यात आली असून हे कारागृहात आहेत तर योगेश गरड यास परराज्यात पळवून लावण्यास स्वप्नील दिलीप वाघ याने मदत पुरवली त्याचबरोबर संजय शंकर राठोड यानेही संशयितांना आश्रय दिल्याचे तपासात समोर आल्याने त्यांनाही आरोपी करण्यात आले आहे.

![]()















