कहते हैं दुश्मन का दोस्त भी दुश्मन ही होता है

वृत्तसंस्था : काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला तर पंधराहून अधिक जण जखमी झाले आहेत. धर्म विचारून निष्पाप पर्यटकांना मारण्यात आले. यामुळे भारतासह जगभरात संतापाची लाट उसळली होती. त्यानंतर संतापलेल्या भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर राबविले यावेळी अनेक मोठ्या आणि ताकदवान देशांनी भारताला पाठींबा दिला तर चीन, तुर्की, आणि अझरबैजान या देशांनी पाकिस्तानचे समर्थन केले. यामुळे या देशांविषयी भारतीय नागरिकांमध्ये प्रचंड संताप निर्माण झाला. मुख्य म्हणजे ऑपरेशन सिंधुर सुरू होण्यापूर्वी काही दिवस आधी एक तुर्की जहाज पाकच्या कराचीत पोहचले. या जहाजात तुर्की सोंगर ड्रोन होते अशी चर्चा होती यादरम्यान यादरम्यान, पाकिस्तानने तुर्कीयेने पुरवलेल्या ड्रोनचा मोठ्या प्रमाणात वापर केला.वृत्तानुसार, दोन्ही देशांमधील आंतरराष्ट्रीय सीमेवर वेगवेगळ्या हल्ल्यांमध्ये एकूण ३५० हून अधिक तुर्की ड्रोनचा वापर करण्यात आला. पाकिस्तानमध्ये उपस्थित असलेले तुर्की लष्करी कर्मचारी भारताविरुद्ध ड्रोन हल्ल्यांमध्ये सहभागी होते, अशी माहिती समोर आली आहे.ऑपरेशन सिंदूर’नंतर, तुर्की सल्लागारांनी पाकिस्तानी सैन्याला भारतावर ड्रोन हल्ले करण्यात मदत केली होती. भारताच्या प्रत्युत्तराच्या कारवाईत दोन तुर्की ड्रोन ऑपरेटर देखील मारले गेल्याचे माहिती समोर आली आहे. याच तुर्कीला मित्र समजून भारताने अत्यंत अवघड क्षणी मदत केल्याचा हा गद्दार तुर्की विसरल्याचे दिसते.६ फेब्रुवारी २०२३ रोजी तुर्कीमध्ये एक विनाशकारी भूकंप झाला होता ज्यामध्ये ५५,००० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता.

त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भूकंपानंतर लगेचच तुर्कीयेला मानवतावादी मदत पाठवण्याची घोषणा केली होती. तुर्कीला मदत करण्यासाठी भारताने ‘ऑपरेशन दोस्त‘ सुरू केले.भारताने तुर्कियेला मदत करण्यासाठी सुरू केलेले हे ऑपरेशन होते. या अंतर्गत, NDRF (National Disaster Response Force) आणि सैन्य दलाच्या टीम्स तुर्कियेमध्ये बचाव आणि मदत कार्यासाठी पाठविण्यात आल्या. ज्या अंतर्गत तुर्कीयेला भारताने वैद्यकीय साहित्य, अन्न आणि इतर आवश्यक वस्तू पाठवून मदत केली.
तुर्कीयेमध्ये भारताची कारवाई १० दिवस चालली होती. भारताने पाठवलेल्या (अन्न) मिठाला हा देश जागला नाही. त्यावेळी याच पाकिस्तानने साधी सुई देखील या देशाला पाठवली नव्हती. त्यामुळे भारतीय नागरिकांनी या देशांच्या विरोधात कठोर निर्णय घेण्यास सुरुवात केली असून या पुढे तुर्की कडून सफरचंद खरेदी न करण्याचा निर्णय देशभरातील व्यापाऱ्यांची सर्वोच्च संघटना असलेल्या कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (कॅट) ने घेतला आहे. भारत दरवर्षी तुर्कीमधून 1.30 मेट्रिक टन सफरचंद आयात करतो त्याचबरोबर तुर्कीहुन येणारे सफरचंद पुण्यात तीन महिने विकले जातात या काळात त्यांची उलाढाल 1200 ते 1500 कोटी रुपयांची होते मात्र हा मोठा फटका तुर्कीला बसणार आहे. भारतीय पर्यटकांकडून मिळणाऱ्या मोठ्या उत्पन्नामुळे तुर्कीची अर्थव्यवस्था चालते. दरवर्षी 3 लाख भारतीय पर्यटक तुर्कीला जातात मात्र तुर्की आणि अझरबैझानवर पर्यटकांनी दोन्ही देशांवर बहिष्कार टाकण्यास सुरवात केल्याने या देशांच्या बुकिंगमध्ये 60 टक्के घट झाली आहे. याशिवाय आधी बुकिंग केलेले तिकीटे रद्द केली जात आहेत.

यामुळे या दोन्ही देशांच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम झाल्याचे चित्र आहे. यावर सोशल मीडियात देखील संताप व्यक्त करण्यात येत आहे.भारतीय नागरिक म्हणतात भारतीयांनी गेल्या वर्षी या देशांना ४,००० कोटी रुपये दिले. आम्ही त्यांच्या अर्थव्यवस्थेला पाठिंबा दिला, पण आज ते आमच्या शत्रूसोबत उभे आहेत. भारतात आणि जगात अनेक सुंदर ठिकाणे आहेत… या दोन्ही ठिकाणांना सोडून द्या. जय हिंद तर दुसरीकडे तरुणांमध्ये या देशांविषयी भयंकर संताप दिसत असून ते सोशल मीडियावर लिहताना, या दोन्ही देशांच्या अर्थव्यवस्थेत पर्यटनाची मोठी भूमिका आहे. तुर्कीच्या जीडीपीमध्ये पर्यटनाचा वाटा १२% आहे आणि तो १०% लोकांना रोजगार देतो. तर, ते अझरबैजानच्या जीडीपीमध्ये ७.६% योगदान देते आणि १०% रोजगार प्रदान करते.
हे देश पाकिस्तानला उघडपणे पाठिंबा देतात, तेव्हा आपण त्यांच्या पर्यटनाला आणि त्यांच्या अर्थव्यवस्थेला चालना द्यावी का?

![]()















