पाकचा खोटारडेपणा जगासमोर पडला उघडा

वृत्तसंस्था : काल पंतप्रधान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला संबोधित केले आणि आज भल्या पहाटे मोदींनी आदमपूर एअरबेसवर जवानांची भेट घेतली. आणि वायुदलाच्या बहाद्दर हवाई योद्ध्यांची नरेंद्र मोदींनी कौतुकाने पाठ थोपटली. मात्र मोदींनी या आदमपूरचीच का निवड केली, असा अनेक भारतीयांच्या मनात उपस्थित होत आहे.

याला कारण देखील तसेच आहे काही दिवसांपूर्वी आदमपूर एअरबेस उद्ध्वस्त केल्याचा खोटा दावा पाकिस्तानने केला होता. आदमपूर एअरबेसची धावपट्टी उद्ध्वस्त झाल्याचा कांगवाही पाकने केला होता. त्याच धावपट्टीवर पंतप्रधान मोदींनी विमान उतरवून धावपट्टी सुरक्षित आहे हे दाखवलं. पंतप्रधान मोदींच्या आदमपूर येथील व्हिडिओ मध्ये दोन गोष्टी दिसत आहेत.एअरबेसवरील लढाऊ विमान मिग-२९ आणि रशियाची एअर डिफेन्स सिस्टीम एस-४०० यामध्ये एस- ४०० ने पाकिस्तानचे ड्रोन हल्लेच नाहीत तर मिसाईल हल्लेही परतवून लावले होते.त्याचबरोबर क्षेपणास्त्रांनी भारतीय हवाई दलाचे विमान पाडले असा दावा पाकिस्तानने केला होता.

यात या विमानतळावरील तैनात मिग २९ दिसत आहेत. पाकिस्तानने मोदी आज गेलेला हवाई दलाचा तळ उध्वस्त केल्याची शेखी मिरविण्यास सुरुवात केली होती. पाकिस्तानी लढाऊ दलाचे विमान JF-17 ने आदमपूर एअरबेससह तिथे तैनात असलेली एस ४०० देखील नष्ट केल्याचा दावा केला होता. पाकिस्तानने यासाठी हायपरसोनिक मिसाईलचा वापर केला होता, असा दावा करण्यात आला होता. तो भारताने आज खोटा ठरविला आहे. पाकिस्तानने ड्रोनने आदमपूरच्या रडार सिस्टमवर हल्ला केल्याचे म्हटले होते. ही रडार सिस्टीम यानंतरही देशाचे संरक्षण करत आहे. म्हणजे हा हल्ला झालाच नाही.हवाई दलाचे अनेक जवान मारल्याचा दावा पाकिस्तानने केला होता. सर्व कर्मचारी सुरक्षित आहेत तसेच आज मोदींच्या स्वागतावेळी हे जवान आनंदोत्सव साजरा करत होते.

त्यानंतर आज मात्र ऑपरेशन सिंदूरमध्ये एकूण 51 जण मारले गेल्याचं पाकिस्तानने म्हटलंय. त्यातले 11 सैनिक आहेत. त्यात 6 पाकिस्तान आर्मीचे तर 5 पाकिस्तान वायुदलाचे सैनिक आहेत.पाकिस्तानचे हवाई हल्ले परतवून लावणाऱ्या भारताच्या बहादूर वायू सैनिकांची यावेळी मोदींनी कौतुकाने पाठ थोपटली आहे.यावेळी ‘भारत माता की जय’ या घोषणेने आसमंत दुमदुमून गेला.नरेंद्र मोदी यांनी यावेळी भारतीय जवानांना संबोधित केलं. यावेळी त्यांनी तीनही सैन्य दलांचं कौतुक केलं. विशेष म्हणजे नरेंद्र मोदी यांनी दहशतवाद्यांना खतपाणी घालणाऱ्या पाकिस्तानला आम्ही घरात घुसून मारु, असा इशारा दिला. पाकिस्तानकडून आदमपूर एअरबेसवर हल्ला करुन एअरबेस उद्ध्वस्त केल्याचा दावा केला जात होता. पण याच एअरबेसवर जावून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानवर सडकून टीका केली.

![]()















