अमेरिकेची मध्यस्थीची घाई आणि पाक सरकारला पाकच्याच लष्कराचा ठेंगा

वृत्तसंस्था : पाकिस्तानच्या लष्करी ऑपरेशन्स महासंचालकांनी आज दुपारी ३:३५ वाजता भारतीय लष्करी ऑपरेशन्स महासंचालकांना फोन करून युद्ध थांबविण्याची विनंती केल्यानंतर दोन्ही बाजूंनी भारतीय प्रमाणवेळेनुसार ५ वाजेपासून दोन्ही बाजूंकडून जमिनीवर, हवेत आणि समुद्र असा सर्वप्रकारचा गोळीबार आणि लष्करी कारवाई थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. भारत सरकारचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबत अधिकृतपणे घोषणा केली होती. यामध्ये अमेरिकेने देखील मध्यस्थी केली होती. मात्र 3 तासांमध्येच पाकिस्तानने पुन्हा एकदा युद्धविराम तोडला आहे. जम्मूतील आंतरराष्ट्रीय सीमेवर राजौरी, उधमपूर, या भागात गोळीबार सुरु केला केला आहे. दरम्यान श्रीनगरमध्ये पुन्हा स्फोटांचे आवाज येत आहेत. दरम्यान पंजाबच्या पठाणकोट मध्ये देखील गोळीबार सुरु केल्याचे वृत्त आहे.श्रीनगर आणि पठाणकोट येथूनही मोठ्या स्फोटांचे आवाज ऐकू आले, त्यानंतर दोन्ही ठिकाणी ब्लॅकआउट लागू करण्यात आले.चर्चेनंतर भारत आणि पाकिस्तानने “तात्काळ आणि पूर्ण” युद्धबंदीवर सहमती दर्शविली आहे, अशी घोषणा अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शनिवारी केली. अमेरिकेच्या मध्यस्थीतून झालेल्या चर्चेमुळे हे शक्य झाले असा दावाही त्यांनी केला. मात्र काही वेळानंतरच पाकिस्तानने युद्धविरामाचे उल्लंघन केले आहे. यादरम्यान दरम्यान जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमार अब्दुल्ला यांनी आपल्या एक्स अकौंट वर पोस्ट करत म्हण्टले आहे की ‘काय झाले युद्धबंदीचे? श्रीनगरमध्ये स्फोटांचे आवाज ऐकू येत आहेत!!!’ मात्र अमेरिकेने घाई घाईत आपल्या मध्यस्थी मुळे पाकिस्तान आणि भारत मध्ये युद्धबंदी झाल्याची घोषणा केली त्यामुळे हा विषय पुन्हा अंतर राष्ट्रीय झाला असून पुन्हा एकदा पाकिस्तान जगात उघडा पडणार आहे की पाकिस्तानचे लष्कर सरकारला किंमत देत नसून या देशात सरकार चे चालत नसून पाकिस्तानचे लष्करच आपला मनमानी कारभार चालवत असल्याचे स्पष्ट होणार असून यामुळे अमेरिकेला देखील नामुष्की पत्करण्याची वेळ येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यानंतर पुन्हा केंद्रीय गृहसचिव गुप्तहेर अधिकाऱ्यांची तातडीची बैठक सुरू झाली आहे

![]()















