नागरिकांची उडाली तारांबळ

नाशिक : संपूर्ण देशात आज 12 एप्रिल शनिवारी दुपारच्या सुमारास UPI (यूपीआय) सेवा ठप्प झाल्याने नागरिकांचा गोंधळ होऊन मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले.पेटीएम,गुगल, फोन पे सारख्या लोकप्रिय ऍप्सचा वापर करणाऱ्या लाखो नागरिकांना याचा फटका सहन करावा लागला.ही अडचण अचानक दुपारी सुरू झाल्याने पेमेंटस, बिल व पैशांचा व्यवहार करताना गोंधळ उडत होता नेमक प्रॉब्लेम कुठे झाला हेच फोन पे धारकांना कळत नव्हते.यादरम्यान अनेक लोकांनी सोशल मीडियावर तक्रारी केल्या.अनेक बँका आणि डिजिटल प्लॅटफार्मवर एकाच वेळी ही अडचण निर्माण झाली होती.तांत्रिक बिघाड झाल्याची शक्यता असून नागरिकांनी पर्यायी पेमेंट पद्धती वापरावी जेणेकरून अडचणी येणार नाहीत.

![]()















