लोकांचे लोकांसाठी, लोकांनी तयार केलेले बजेट

नाशिक : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केंद्रीय अर्थसंकल्पात महिलांसाठी मोठी घोषणा केली आहे. देशातील महिलांना व्यवसाय सुरु करण्यासाठी सरकार 10 हजार कोटी रुपयांचे योगदान देऊन स्टार्टअपसाठी फंडची व्यवस्था करेल. पहिल्यांदाच व्यवसाय सुरू करणाऱ्या पाच लाख महिला, अनुसूचित जाती आणि जमाती उद्योजकांसाठी सरकार 2 कोटी रुपयांची कर्ज योजना सुरू करेल. यामुळे महिलांना विना गॅरंटी सहज अटींवर लोण मिळणार आहे. जेणेकरून महिलांना छोट्या आणि मध्यम आकाराचा व्यवसाय सुरु करता येईल. सरकारच्या या योजनेत महिलांना 5 वर्षांसाठी 2 कोटी रुपये टर्म लोणची सुविधा मिळेल .महिलांना उद्योग वाढविण्यासाठी डिजिटल ट्रेनिंग, मार्केटिंग सपोर्ट मिळणार आहे त्यामुळे अधिकाधिक महिला व्यवसायाकडे वळाव्यात आणि रोजगार देणाऱ्या व्हाव्यात अशी तरतूद अर्थमंत्र्यांनी यंदाच्या अर्थसंकल्पात केली आहे.

शेतकऱ्यांकडेही लक्ष—- देशातील विकसिल 100 जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान धन्य योजना राबवितानाच किसान क्रेडिट कार्ड वरील व्याज सवलतीने मिळणाऱ्या कर्जाची मर्यादा तीन लाख रुपयांवरून पाच लाख करण्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीताराम यांनी संसदेत अर्थसंकल्प सादर करताना केली. कापूस उत्पादकता वाढविण्यासाठी मोहीम राबविण्यात येणार आहे तसेच तूर, उडीद आणि मसूर या डाळींमध्ये स्वयंपूर्णता मिळवण्यासाठी सहा वर्षाचे अभियान राबविण्यात येणार आहे. धान्य साठविण्यासाठी गोदामे वाढविणे जलसिंचन सुविधांमध्ये वाढ करणे अल्प आणि दीर्घ मूर्तीच्या कर्जाची उपलब्धता शेतकऱ्यांना करून देण्याचा समावेश करण्यात आला आहे यामुळे ग्रामीण भागात रोजगार निर्मिती बरोबरच गुंतवणूक आणि नव्या तंत्रज्ञानाचाही वापर वाढवून ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे 1 कोटी 7 लाख शेतकऱ्यांना याचा लाभ मिळण्याची शक्यता आहे. सरकारने ग्रामीण विकासासाठी अर्थसंकल्पात 2 लाख 67 हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे 2024 -25 या वर्षाच्या अर्थसंकल्पात यासाठी 1 लाख 80 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती.

देशात डॉक्टरांची संख्या वाढणार —2025-26 या आर्थिक वर्षात 200 ‘डे केअर’ केंद्र उभारली जातील आरोग्य सेवा पायाभूत सुविधा अधिक बळकट करण्यासाठी पुढील पाच वर्षात वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या 750 हजार जागा निर्माण होतील. आगामी शैक्षणिक वर्षात वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयांमध्ये 10 हजार अतिरिक्त जागा सुरू केल्या जातील. खाजगी क्षेत्राच्या साह्याने मेडिकल टुरिझम वर भर देण्यात येणार आहे. वाढीव जागांमुळे देशात डॉक्टरांची संख्या वाढणार आहे. आरोग्य क्षेत्रासाठी अर्थसंकल्पात एकूण 98 हजार 311 कोटी रुपये निधीची तरतूद केली असून गतवर्षीच्या तुलनेत यंदा सुमारे 8 हजार कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

सशस्त्र दलांचे आधुनिकीकरण— बदलत्या सुरक्षा परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सहस्रदलांचे आधुनिकीकरणावर पुन्हा लक्ष केंद्रित करताना 2025- 26 साठी अर्थसंकल्पात 6.81 लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये नवीन शस्त्रे, विमाने, युद्धनौका, आणि इतर लष्करी उपकरणे खरेदी करणे आदींचा समावेश आहे. संरक्षण क्षेत्रासाठी मेक इन इंडिया ने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. 2024 मध्ये स्वदेशी संरक्षण उत्पादन मूल्य 1.26 लाख कोटी नोंदवले जे आतापर्यंतचे सर्वाधिक आहे 2024-25 मध्ये भांडवली खर्च 1.72 लाख कोटी होता सुधारित अंदाजानुसार ही रक्कम 1.59 कोटी रुपये आहे. युद्धाचे स्वरूप बदलत असल्याने सैन्य दलाने आधुनिक शस्त्रांनी सुसज्ज करणे आणि तांत्रिकदृष्ट्या प्रगत आणि लढाऊ बनवण्यावर अर्थसंकल्पात भर दिला आहे.

![]()















