कांदाप्रश्नावर शेतकरी रस्त्यावर

नाशिक : कृषी खाते हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे आले आणि नाशिक जिल्ह्यातील सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे यांची कृषिमंत्रीपदी निवड झाली. मात्र आता कोकाटे यांच्यासमोर कांद्याचा प्रश्न सोडविण्याचे मोठे आव्हान असणार आहे. कांद्याचे भाव कोसळल्याने नाशिक जिल्हासह महाराष्ट्रात कांद्याचा प्रश्न पेटला असून शेतकरी आता रस्त्यावर येण्याच्या तयारीत आहेत . शेतकरी आता केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर लावलेले 20 टक्के निर्यात शुल्क हटविण्याची मागणी करू लागले आहेत. महाविकास आघाडी या प्रश्नावर आक्रमक होताना दिसत असून कांद्याला सरासरी भाव 4200 ते 4600 रुपये क्विंटल भाव मिळत होता मात्र बाजार समित्यांमध्ये कांद्याची आवक वाढली आणि कांद्याचा 1200 ते 1300 इतका भाव कमी झाला त्यामुळे शेतकऱ्यांन मध्ये संतापाचे वातावरण असून केंद्र सरकारवर निर्यात शुल्क हटवण्याचा दबाव वाढत आहे. त्यामुळे नवनियुक्त कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यासमोर कांदा प्रश्न एक आव्हान म्हणून उभा राहणार आहे. तोडगा काढू–कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी एक दोन दिवसात पुणे येथे केंद्रीय कृषिमंत्री येणार असून त्यांच्यासमवेत चर्चा करून कांदाप्रश्नी कायमस्वरूपी तोडगा काढू अशी ग्वाही दिली आहे.

![]()















