नागपूर,चंद्रपूर पुणे हॉटस्पॉट तर सोलापूर सर्वाधिक उष्ण !

ब्लँक अँड वाइट वृत्तसेवा : देशातील आठ राज्यांमध्ये उष्णतेची लाट सुरू आहे. यामध्ये महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, कर्नाटक तेलंगाना, ओडिसा, झारखंड बिहार आणि पश्चिम बंगालचा समावेश आहे. यापैकी बहुतांश राज्यांमध्ये तापमान 43 अशांवर किंवा त्यापुढे पोहोचले आहे. महाराष्ट्रातील सोलापूर तसेच चंद्रपूरचा सर्वाधिक तापमानाच्या दहा शहरात समावेश आहे. सोलापूर राज्यात सर्वाधिक उष्ण शहर ठरले असून या शहराचा पारा 43.3 अंशावर उसळला होता. पुणे, नागपूर हॉटस्पॉट बनलेले असून कोल्हापुरातही यावेळी जीवाची काहीली होत आहे. उर्वरित उन्हाळ्यातही उष्णता आणखीन वाढण्याची शक्यता आहे. दुसरीकडे राजस्थान, मध्यप्रदेश, आसाम मेघालय, अरुणाचल प्रदेश, केरळ ,आणि सिक्कीम या राज्यांमध्ये मात्र पावसाचा अंदाज वर्तवला जात आहे. जम्मू काश्मीर आणि हिमाचल प्रदेश अशा डोंगराळ राज्यांमध्ये काही ठिकाणी बर्फ वृष्टी सुरू आहे. तर याच राज्यांमध्ये काही ठिकाणी आणखी भरपूर बर्फ वृष्टीची शक्यता आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार मध्य प्रदेशातील 33 जिल्ह्यांमध्ये गारांसह पावसाची शक्यता आहे. बिहार मधील 24 जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला. आहे सात आणि आठ एप्रिलला दक्षिण विहारच्या छत्तीसगडमध्ये काही भागात हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. झारखंडमध्ये 9 एप्रिल पर्यंत उष्णतेची लाट आणि पावसाचा इशारा देण्यात आला. आहे हरियाणा मध्ये 11 एप्रिल नंतर हवामानात बदल होण्याची शक्यता आहे 12 एप्रिल ते 16 एप्रिल दरम्यान हरियाणा मध्ये जोरदार वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याची दाट शक्यता आहे.

![]()














