या हत्याकांडाचे मूळ कारणसुद्धा अवैध धंदे हेच….

नाशिक : दोन टोळ्यांच्या वर्चस्ववादातून रंगपंचमीच्या रात्री बोधलेनगर येथील आंबेडकरवाडीमध्ये टोळक्याने उमेश व प्रशांत भगवान जाधव या दोघा सख्ख्या भावांचा एकापेक्षा जास्त शस्त्राने वार करत निर्घृण खून करण्यात आला होता. या दुहेरी खुनाने शहर हादरून गेले होते. या गुन्ह्यात पोलिसांनी संशयित सागर मधुकर गरड, अनिल विष्णू रेडेकर, योगेश चंद्रकांत रोकडे, सचिन विष्णू रेडेकर, अविनाश उर्फ सोनू नानाजी आहिरे,योगेश मधुकर गरड यांना अटक करण्यात आली होती. मात्र त्यानंतर गुन्ह्याचा तपास योग्यरीत्या होत नाही म्हणून नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोठा मोर्चा काढला होता. यामध्ये संबंधित पोलीस अधिकारी योग्य तपास करत नव्हते. त्यांच्या नावांचे फलक देखील या मोर्चामधील नागरिकांच्या हातात होते. त्यांनतर पोलीस आयुक्तांनी मोर्चाची दखल घेऊन जाधव बंधूंच्या हत्येचा तपास करण्यासाठी ‘एसआयटीची’ स्थापना केली. त्यानंतर संशयितांची कसून चौकशी केली असता सातवा फरार संशयित मंगेश चंद्रकांत रोकडे याचे नाव पुढे आल्यानंतर त्यास गुंडाविरोधी पथकाने ठाण्यातून बेड्या ठोकल्या संशयित मंगेश रोकडे याची कसून चौकशी केली असता आठवा आरोपी निलेश शांताराम महाजन याचे नाव पुढे आले. मंगेश रोकडे याने पुरावे नष्ट करण्याचे प्रयत्न केले होते त्याचप्रमाणे निलेश महाजन याने खुनासाठी वापरलेली हत्यारे नष्ट करण्यासाठी मदत केली होती. अशी प्राथमिक माहिती पुढे आल्याचे पोलीस सांगतात.. या दुहेरी खुनाचा तपास एसआयटी मार्फत सुरू असून पथकाने आतापर्यंत दोन फरार संशयित आरोपींना गजाआड करण्यात यश मिळविले आहे. मुख्य म्हणजे या हत्याकांडाचे मूळ कारणसुद्धा अवैध धंदे हेच होते.

![]()















