भारतीय उदयोगविश्वाचा आधारवड हरवला

मुंबई -प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचे वयाच्या 86 व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन झाले आहे.देशातील प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचे आज (दि.9) निधन झाले. मुंबईतील ब्रीचकँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. रतन टाटा यांच्यावर उपचार सुरु असताना इंटेसिव्ह केअर युनिटमध्ये ठेवण्यात आलं होतं. त्यांची प्रकृती गंभीर होत चालल्याने त्यांच्यावर उपचार सुरु होते.
रतन टाटा यांनी मार्च १९९१ ते डिसेंबर २०१२ या काळात टाटा सन्सचे अध्यक्ष म्हणून टाटा समूहाचे नेतृत्व केले. परदेशात शिक्षण पूर्ण केल्यानंतर रतन टाटा प्रथम टाटा समूहाच्या कंपनी टाटा इंडस्ट्रीजमध्ये सहाय्यक म्हणून रुजू झाले. यानंतर त्यांनी काही महिने जमशेदपूर येथील टाटाच्या प्लांटमध्ये प्रशिक्षण घेतले. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर रतन टाटांनी आपल्या जबाबदाऱ्या सांभाळायला सुरुवात केली. २००८ मध्ये रतन टाटा यांना भारत सरकारने पद्मविभूषण या देशातील दुसऱ्या सर्वोच्च नागरी सन्मानाने सन्मानित केले. ही खूप दुःखद बातमी असून “न्यूज ब्लॅक अँड व्हाईट” च्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली

![]()














